Friday, March 20, 2020

SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न - योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे


SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरा सह -
योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे



प्रश्न-  खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

(१) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
उत्तर- योग्य

(२) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-
भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा
जास्त आहे.

(४) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
उत्तर- योग्य

(५) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा
लाभला आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझील देशाला अटलांटीक महासागराचा किनारा लाभला आहे.

(६) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

(७) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.
उत्तर- योग्य

(८) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा
परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर- योग्य

(९) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान
ऋतू असतात.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असुु शकत नाहीत.

(१०) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
उत्तर- योग्य

(११) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या
प्रमाणात पाऊस पडतो.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-.ब्राझील देशात आग्नेय ईशान्यदिशेकडून येणाऱ्या  पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.



प्रश्न- पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.


(१) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
उत्तर : 
(१) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत
वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीदवारे अडवले जातात.
(२) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत
जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व बाझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
(३) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य
पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो..

(२) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर : 
 (१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय
वाऱ्यांमळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखादया देशातीलसमुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण
कटिबंधात आहे.
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही..

(३) ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे
उत्तर : 
(१) कृमी व कोटक है प्रामुख्यान घनदाट वनांन प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
(२) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी वर
खादय असते.
(३) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे.
नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पटना
दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीट
संख्या जास्त आहे.

(४) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
उत्तर : 
 (१) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(३) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्यावाढत आहेत. भारतात 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

(५) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.
उत्तर : 

(१) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे
प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका' या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
(३) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

(६) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर : 
 (१) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेकवसाहतवादयांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
(२) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
(३) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

(७) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
उत्तर : 
 (१) शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा
प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
(२) या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.'
(३) या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.'

(८) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर : 
(१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या
पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(९) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय
भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
(२) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
(३) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय
कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.


(१०) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर : 
 (१) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस
किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७,२६३ चौरस किमी आहे.
(२) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट,भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
(३) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व
लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

(११) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर : 
 (१) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे
सह-अस्तित्व असते.
(२) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
(३) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य,
शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.


(१२) ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.
उत्तर : 
(१) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२)ब्राझीलमधील बहतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
(३) ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणन
(अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.

(१३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या
प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उदयोग भरभरातीस आले आहेत.
(३) या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.

(१४) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.
उत्तर : 
(१) वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहना
दसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते.
(२) वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते.
(३) वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व
आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.

(१५) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
उत्तर : 
 (१) जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे.
त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
(२) आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात
निर्यात केली जाते.
(३) आतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.


SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव वस्तुनिष्ठ प्रश्न जोड्या, वेगळा घटक,अचूक पर्याय


 SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह-

 (जोड्या,वेगळा घटक आणि अचूक पर्याय)






प्रश्न- जोड्या जुळवा
प्रश्न- वेगळा घटक ओळखा.
प्रश्न . अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

प्रश्न- जोड्या जुळवा :

'अ' गट                                 'ब' गट
(१) सदाहरित वने               (अ) सुंद्री
(२) पानझडी वने                (ब) पाइन
(३) समुद्राकाठची वने          (क) पाव ब्राझील
(४) हिमालयीन वने              (ड) खेजडी
(५) काटेरी व झुडपी वने       (ई) साग
                                       (फ) आमर
                                        (ग) साल
उत्तर- (१)- क (२)-इ (३)-अ (४)-ब (५)-ड

'अ' गट                                 'ब' गट
(१) ट्रान्स अॅमेझॉलियन मार्ग    (अ) पर्यटन स्थळ
(२) रस्ते वाहतूक                   (ब) भारतातील रेल्वे स्थानक
(३) रिओ दी जनेरिओ            (क) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(४) मनमाड                         (ड) प्रमुख रस्ते मार्ग
                                         (ई) ४०° पश्चिम रेखावृत्त
उत्तर- (१)- ड (२)-क  (३)-इ (४)-ब 


 प्रश्न- वेगळा घटक ओळखा.

(१) ब्राझीलमधील वनप्रकार.
(अ)काटेरी झुडपी वने
(ब) सदाहरित वने
(क) हिमालयीन वने
(ड) पानझडी वने

(२) भारताच्या संदर्भात -
अ) खारफुटीची वने
(ब) भूमध्य सागरी वने
(क) काटेरी झुडपी वने
(ड) विषुववृत्तीय वने

(३) ब्राझीलमधील वन्य प्राणी.
 (अ) अॅनाकोंडा
 (ब) तामिर
 (क) लाल पांडा
 (ड) सिंह

(४) भारतीय वनस्पती.
(अ) देवदार
(ब) अंजन
(क) ऑर्किड
(ड) वड.

(५) हिमालयातील वनांतील वृक्ष.
(अ) पाईन
(ब) पिंपळ
(क) देवदार
(ड) फर.

उत्तरे : (१)-(क); (२)-(ड); (३)-(क); (४)-(क);
(५)-(ब).

प्र.२ अचूक गट ओळखा:

(१) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
(अ) पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी
(ब) गियाना उच्चभूमी - अॅमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(क) किनारपट्टीचा प्रदेश – ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी

(२) ब्राझीलच्या या नदया उत्तरवाहिनी आहेत.
(अ) जुरुका - झिंगू – अरागुआ
(ब) निग्रो - ब्रांका – पारु
(क) जापूआ – जारुआ – पुरूस

 (३) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात.
(अ) कर्नाटक – महाराष्ट्र – बुंदेलखंड
(ब) छोटा नागपूर – माळवा – मारवाड
(क) तेलंगणा – महाराष्ट्र - मारवाड

(४) भारतातील पुढील राज्यांत प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो.
(अ) हिमाचल प्रदेश – मध्य प्रदेश – आसाम
(ब) जम्मू आणि काश्मीर – उत्तराखंड – महाराष्ट्र
(क) तेलंगणा – महाराष्ट्र – कर्नाटक

(५) ब्राझीलमधील पुढील राज्यांत गियाना उच्चभूमी विस्तारलेली आढळते.
(अ) पारा -पाराना – बाहिया
(ब) रोराइमा – पारा - सांता
(क) आमापा – सांता - सियारा

उत्तरे : (१)-(ब); (२)-(अ); (३)-(अ); (४)-(क);
(५)-(ब).

प्रश्न 3. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ..

(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.

(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा-----

(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नदया आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.

(३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ......

(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.

(४) अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या
नदीच्या मुखालगत......

(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.

(५) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही......

(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली
आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.

(६) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ...

(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.

उत्तरे : (१)-(i); (२)-(ii); (३)-(iii); (४)-(ii);
(५)-(ii);(६)-(iii).

SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न रिकाम्या जागा


SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह (रिकाम्या जागा)


प्रश्न . कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा व पुन्हा लिहा.

(1) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने
ओळखले जाते.
(i) लक्षद्वीप
(ii) कन्याकुमारी
(iii) इंदिरा पॉईंट
 (iv) पोर्ट ब्लेअर
उत्तर-  (iii) इंदिरा पॉईंट

(2) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या
सीमेलगत नाहीत.
(i) चिली-इक्वेडोर
(ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया
(iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना
(iv) सुरीनाम-उरुग्वे
उत्तर-  (i) चिली-इक्वेडोर

(3) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट ........... प्रकारची आहे.
 (i) लष्करी
 (ii) साम्यवादी
 (iii) प्रजासत्ताक
 (iv) अध्यक्षीय
उत्तर- (iii) प्रजासत्ताक

(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा ----------- या
संलग्न आहे.
 (बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ)
उत्तर- बांग्लादेश

(५)-------- ही भारताची राजधानी आहे.
(यानम, नवी दिल्ली , दीव, चंदीगढ)
उत्तर- नवी दिल्ली

(६)--------ही ब्राझीलची राजधानी आहे.
(बाहिया, ब्राझीलिया, रोन्डोनिया, रोराईमा)
उत्तर- ब्राझीलिया

(७) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे.
कारण--------
(कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य
कमतरता)
उत्तर- प्रचंड लोकसंख्या

(८) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने---------
व्यवसायावर अवलंबून आहे.
(प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक)
उत्तर- तुतीयक

(९) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही
-------- प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
(अविकसित, विकसित, विकसनशील, अतिविकसित)
उत्तर- विकसनशील

(१०) भारतात ----------- राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(गुजरात, गोवा, पंजाब, पश्चिम बंगाल)
उत्तर- गुजरात

(११) ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर -- -------- निर्यात
केली जाते.
(खतांची, वाहनांची, कॉफीची, यंत्रांची)
उत्तर- कॉफीची

(१२) ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी............ सर्वाधिक वापर केला जातो.
(अ) जलमार्गांचा
(ब) रस्ते मार्गांचा
(क) लोहमार्गांचा
(ड) हवाई मार्गांचा
उत्तर- रस्ते मार्गांचा

(१३) भारताच्या आर्थिक विकासास....... मोठ्या प्रमाणावर
चालना दिली आहे.
(अ) जलमार्गांनी
(ब) हवाई मार्गांनी
(क) रस्ते मार्गांनी
(ड) लोहमार्गांनी
उत्तर- लोहमार्गांनी

(१४) भारतातील--------राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे
आढळते.
(अ) उत्तर प्रदेश
(ब) महाराष्ट्र
(क) मध्य प्रदेश
 (ड) राजस्थान
उत्तर- राज्यस्थान

(१५) ब्राझीलमध्ये ------------- भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे.
 (अ) दक्षिण
 (ब) मध्य
 (क) पूर्व
 (ड) वायव्य
उत्तर- वायव्य

(१६) ब्राझीलमध्ये एकूण ------------- प्रमाणवेळा मानल्या जातात.
 (अ) दोन
 (ब) तीन
 (क) चार
 (ड) पाच
उत्तर- चार

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महा...