Sunday, March 6, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 2023 महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला

 

बारावी बोर्ड परीक्षा 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला 20 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न पहिला 20 गुणांसाठी सराव



प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)  👇                               

१) युरोपीय संघातील देशांत -------- हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले.

( पाउंड, युरो, फ्रेंक, डोइश मार्क)

२) १९९० चे दशक हे-------- हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.

( मानवतावादी, दहशतवादी,साम्यवादी, तत्त्ववादी)

३) जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम -------- ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आले.

(३५२,३५६,३७०,३७६)

४) भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून -------- मध्ये नियुक्ती केली.

(२०१९,२०२१,२०१६,२०१८)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) युरो २) मानवतावादी ३)३७० ४)२०१९ ५) पंडित नेहरू

१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.

( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.

( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)

३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.

(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)

४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.

(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) दविध्रुवितेचा अस्त २) चीन ३) सक्षमीकरण 

         ४) नक्षलवादी चळवळ ५) पंडित नेहरू

१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली

(१९९०, १९८५, १९९५, १९९९)

२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.

( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)

३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.

(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)

४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.

(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)

५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.

(२००२,२००७,२००५,२००० )

उत्तर - 1)१९८५ 2) जैतापूर 3) महिलांसाठी 4) तेलंगणा 5) २००५

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)  👇                           

(१) अ) संविधानातील कलम ५१- भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे

      ब) जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण - १९९० च्या दशकापासून

      क) पंडित नेहरू - भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार

      ड) अलिप्ततावाद - लष्करी कराराचा भाग होणे.

(२) अ) राज्य - कायदा व सुव्यवस्था राखणे

      ब) अराजक - सुशासनाचा अभाव

      क) राष्ट्र - राज्याचे विस्तारित स्वरूप

      ड) राष्ट्रवाद - राजकीय अस्मितेची निर्मिती

(३) अ) शीतयुद्धाची समाप्ती - पूर्व-पश्चिम वादाचा अखेर

      ब) सोव्हिएत युनियनचे विघटन - नवीन राष्ट्रांचा उदय

     क) दविध्रुविता संपुष्टात आली - रशियाची वर्चस्व प्रस्थापित झाले.

     ड) चीन व भारताचा वाढता प्रभाव - बहुध्रुविय व्यवस्थेचा उदय 

 उत्तर - १) अलिप्ततावाद - लष्करी कराराचा भाग न होणे.

           २) राष्ट्र - एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय.

३) द्वीध्रुवीयता संपुष्टात आली- अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित झाले. 


(१) अ) NATO - युरोप

      ब) ANZUS - आफ्रिका

       क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया

       ड) CENTO - पश्चिम आशिया

उत्तर - ब) ANZUS - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अमेरिका

(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India

      ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE

      क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०

      ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती

उत्तर - क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - १९६१

(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन

      ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन

      क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.

      ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन

उत्तर - क) पारदर्शकता- सुशासन 

(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७

      ब) बांडुंग परिषद - १९५५

      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०

      ड) बेलग्रेड परिषद - १९६१

उत्तर - क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९४५

(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती

     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल

     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा

     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली

  उत्तर - ब) आझादी चळवळ - जम्मू काश्मिर

(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो

      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC

      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल

      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

         उत्तर -   ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- नेस्ले 


प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)   👇                               

१) मास्त्रीक्त करार संदर्भ -

    (अ) संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल

    (ब) युरोपीय संघ 

    (क) अमेरिकेचा कुवेत मध्ये हस्तक्षेप 

    (ड) ब्रिक्स ची स्थापना

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशात संदर्भात वापरले जाते.

(अ) भारत

(ब) चीन 

(क) फ्रान्स 

(ड) अमेरिका

३) रिओ दि जानेरिओ अर्थ समिट (1992) यावर लक्ष केंद्रित करते.

(अ) पर्यावरण आणि विकास 

(ब) आण्विक प्रसारबंदी 

(क) आंतरराष्ट्रीय व्यापार

(ड) लिंगभाव निगडीत समस्या

४) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

(अ) अमेरिका 

(ब) युनायटेड किंग्डम

(क) स्वीडन 

(ड) रशिया 

 उत्तर - १) युरोपीय संघ २) चीन ३) पर्यावरण आणि विकास ४) स्वीडन

१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

   (अ) अमेरिका

   (ब) युनायटेड किंग्डम

   (क) स्वीडन 

   (ड) रशिया

२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-

(अ) पंचायती राज

(ब) राष्ट्रीय एकात्मता

(क) राष्ट्र ही संकल्पना

(ड) Melting Pot ही संकल्पना

३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.

(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन 

(ब) शीतयुद्धात सहभाग 

(क) लोकशाही समाजवाद एक धोरण

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.

(अ) बांगलादेश 

(ब) पाकिस्तान

(क) चीन 

(ड) नेपाळ

उत्तर - १) स्वीडन २) राष्ट्रीय एकात्मता ३) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन ४) बांगलादेश

१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------

(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.

(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.

(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 

(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.

२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----

(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.

(ब) महिला सक्षमीकरणासाठी.

(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.

(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.

३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण----

(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.

(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.

(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----

(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 

(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.

(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 

(ड) महागाई कमी झाली.

उत्तर - 1) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले.

           2) पंचायतीराज सक्षम करण्यासाठी.

           3) देशातील प्रदेशांची संस्कृतीक ओळख निर्माण

 करण्यासाठी.

           4) जागतिकीकरणाचा प्रसार झाला.


प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)     👇👇

१) जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन-

२) मानवाधिकाराची जोपासना करणारी यंत्रणा -

३) एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय -

४) जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास व सिंचन पद्धतींचा विस्तार -

 उत्तर - १) परराष्ट्र धोरण २) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ३) राष्ट्र ४) हरितक्रांती


१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-

२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -

३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -

४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -

उत्तर - १) लोकपाल आणि लोकायुक्त २) दहशतवाद ३) आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ४) सॉफ्ट पॉवर


१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-

२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -

३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-

४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

उत्तर - 1) दारिद्र्य / गरिबी 2) अलिप्ततावाद 3) वन बेल्ट वन रोड 4) शेंगेन व्हिसा


प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                                   👇                                    

१) सार्कचे सदस्य - चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश

२) दंगल, उठाव, हिंसाचार, सत्याग्रह 

३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, लोकपाल,राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग,

४) पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, शिक्षण

उत्तर - १) चीन २) सत्याग्रह ३) लोकपाल ४) शिक्षण

१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन

२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद 

३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी

४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड

उत्तर - १) ग्रामोफोन २) राष्ट्रवाद ३) सोनिया गांधी 

         ४) दारिद्र्य

१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.

२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 

३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन

४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

उत्तर - 1) आधार कार्ड देणे 2) मेघालय 3) बुलेट ट्रेन 4) राष्ट्रवाद

समाप्त...... ✌✌✌





                                




13 comments:

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महा...