Dr.Ram Dhage

Thursday, July 7, 2022

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध भाषांमध्ये पाठ्यपुराक व पूरक साहित्य तयार करत आहे. सध्या संपूर्ण भारतात नवीन राष्ट्रीय धोरण 2020 राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा विषय समित्यांचे गठन करणे शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे यासाठी भाषा व विषय समित्यावर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकातील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची निवड करण्यासाठी सदर लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जाहिरात क्रमांक: 1029 
दिनांक 1/7/ 2022
लिंक भरण्याचा कालावधी दिनांक 4/7/2022 ते 20/7/2022 रात्री 12:00 वाजेपर्यंत

अर्ज करण्यासाठी निळ्या रंगाच्या लिंक वरती क्लिक करा.
👇👇👇👇👇👇




Sunday, March 6, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 2023 साठी महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न 2 .राज्यशास्त्र विषय

 बारावी बोर्ड परीक्षा 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न दुसरा संकल्पना चित्र व नकाशा 09 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न दुसरा 09 गुणांसाठी सराव



प्रश्न 2. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.

 (गुण 04) 👇👇

1)  👇



उत्तर - १) सहभागात्मक २) कायद्याचे राज्य

  ३) प्रतिसादात्मक ४) परिणाम आणि कार्यक्षमता

2) 👇

 


उत्तर - १) भौगोलिक २) ऐतिहासिक

           ३) राजकीय ४) आर्थिक

3)  👇


उत्तर - 1) बांगलादेश 2) नेपाळ 3) थायलंड 4) भूतान

4) 👇



उत्तर - 1)समान नागरिकत्व 2) सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय  3) धर्मनिरपेक्षता 4) बंधुत्व जोपासणे

5) 👇



उत्तर - 1) लोकपाल आणि लोकायुक्त 2) नागरीकांचा प्रशासनातील सहभाग.

प्रश्न 2 ब) खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.👇👇  (गुण 05) 

1)  👇

१) युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या दोन राष्ट्रांची नावे लिहा.    (२)                                   

२) युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य नसलेल्या दोन राष्ट्रांची नावे लिहा.      (२)                                 

३) फ्रान्स राष्ट्र शेजारील कोणत्याही एका राष्ट्राचे नाव लिहा.(१)      




उत्तर - १) स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, फिनलंड, ऑस्ट्रिया, स्वालवेनिया
२) स्वीडन, पोलंड, रूमनिया,हंगेरी, चेक प्रजासत्ताक
३) स्पेन, जर्मनी, इटली


2) 👇

१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                         

२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)                

३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)



उत्तर - १) स्पेन,फ्रान्स  

         २) नॉर्वे, रुमानिया

          ३) बेलारूस, युक्रेन

3) 👇

१) हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                             

२) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)

३) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत नसणाऱ्या कोणत्याही एका देशाचे नावे लिहा. (१)     



उत्तर - 1) मालदीव, इंडोनेशिया    

            2) श्रीलंका, म्यानमार

            3) पाकिस्तान

4) 👇

1) जगाच्या नकाशातील भारताच्या सीमेलगतच्या दोन देशांची नावे लिहा. (२)
2) जगाच्या नकाशात सार्क सदस्य असलेल्या दोन  देशांची नावे लिहा.(२)
3) जगाच्या नकाशातील कोणत्याही एका महासागराचे नाव लिहा. (१)


उत्तर -

1) चीन, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड
2) भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव
3) पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर

5) 👇

1) दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून नकाशात असणाऱ्या दोन समुद्रांची नावे लिहा.
2) इराक बरोबर सीमारेषा असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
3) कुवेत आणि इराक या नकाशात कोणते आखात आहे.


उत्तर - 
1) भूमध्य समुद्र, काळा समुद्र
2) सौदी अरेबिया, कुवेत, इराण,अर्मेनिया, सीरिया, जॉर्डन
3) ओमानचे आखात

6)  👇

1) युरोप या  नकाशातील कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
2) युरोप या नकाशातील कोणत्याही दोन समुद्रांची नावे लिहा.
3) युरोप या नकाशात कोणता उपसागर आहे.



उत्तर - 
1) फ्रान्स, जर्मनी 
2) भूमध्य समुद्र, नॉर्वेचा समुद्र
3) बिस्केचा उपसागर

समाप्त.....✌✌✌










बारावी बोर्ड परीक्षा 2023 साठी महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न 3 राज्यशास्त्र विषय

 

बारावी बोर्ड परीक्षा 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न तिसरा चूक की बरोबर 10 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न तिसरा 10 गुणांसाठी सराव


प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                          

१) सूशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सुशासन आत समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा समावेश होतो.

२) समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.

३) नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, नियोजन आयोगाची निर्मिती सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी केलेली आहे.

४) जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ बनली आहे.

५) दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार व्यवस्था करार २००६ पासून कार्यान्वित आहे.

६) शहरातील मॉल्सच्या स्पर्धेत छोट्या दुकानदारांचा टिकाव लागत नाही.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, शहरातील मॉल्स त्यांच्या ग्राहकांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देत असतात.

७) भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण - भारतातील असंख्य जाती, धर्म, भाषा, वंश व प्रांतीय अस्मिता यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या गुंतागुंतीची झालेली आहे.

८) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, 1990 च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.

९) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे.

१०) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक संरक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.

११) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, स्वातंत्र्य चळवळीमुळे सर्व भारतीय विविधता विसरून एकत्र आल्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळ पोषक ठरली.

१२) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, लोकायुक्तांना फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी विरोधात चौकशी करण्याचे अधिकार आहेत.

१३) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, प्राचीन काळापासून भारताचे म्यानमार सोबत आर्थिक, सांस्कृतिक संबंध आहेत.

१४) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, सागरमाला ही योजना बंदराधिरीत विकासासाठी आहे.

१५) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, मास्त्रीक्त करार युरोपियन युनियनच्या स्थापनेसाठी करण्यात आला होता.

१६) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात सहभागी सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे आहे.

१७) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे.

१८) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, विविध समाज घटकांशी भिन्नतेमुळे अडचणी निर्माण होतात.

१९) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, पारंपरिक प्रशासनात दप्तर दिरंगाई व लालफितीचा कारभार हे दोष होते.

२०) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाला भारताने विरोध केला होता.

२१) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते, विविधतेतून एकात्मता साध्य करते.

बारावी बोर्ड परीक्षा 2023 महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला

 

बारावी बोर्ड परीक्षा 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला 20 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न पहिला 20 गुणांसाठी सराव



प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)  👇                               

१) युरोपीय संघातील देशांत -------- हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले.

( पाउंड, युरो, फ्रेंक, डोइश मार्क)

२) १९९० चे दशक हे-------- हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.

( मानवतावादी, दहशतवादी,साम्यवादी, तत्त्ववादी)

३) जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम -------- ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आले.

(३५२,३५६,३७०,३७६)

४) भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून -------- मध्ये नियुक्ती केली.

(२०१९,२०२१,२०१६,२०१८)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) युरो २) मानवतावादी ३)३७० ४)२०१९ ५) पंडित नेहरू

१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.

( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.

( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)

३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.

(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)

४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.

(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) दविध्रुवितेचा अस्त २) चीन ३) सक्षमीकरण 

         ४) नक्षलवादी चळवळ ५) पंडित नेहरू

१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली

(१९९०, १९८५, १९९५, १९९९)

२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.

( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)

३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.

(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)

४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.

(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)

५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.

(२००२,२००७,२००५,२००० )

उत्तर - 1)१९८५ 2) जैतापूर 3) महिलांसाठी 4) तेलंगणा 5) २००५

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)  👇                           

(१) अ) संविधानातील कलम ५१- भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे

      ब) जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण - १९९० च्या दशकापासून

      क) पंडित नेहरू - भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार

      ड) अलिप्ततावाद - लष्करी कराराचा भाग होणे.

(२) अ) राज्य - कायदा व सुव्यवस्था राखणे

      ब) अराजक - सुशासनाचा अभाव

      क) राष्ट्र - राज्याचे विस्तारित स्वरूप

      ड) राष्ट्रवाद - राजकीय अस्मितेची निर्मिती

(३) अ) शीतयुद्धाची समाप्ती - पूर्व-पश्चिम वादाचा अखेर

      ब) सोव्हिएत युनियनचे विघटन - नवीन राष्ट्रांचा उदय

     क) दविध्रुविता संपुष्टात आली - रशियाची वर्चस्व प्रस्थापित झाले.

     ड) चीन व भारताचा वाढता प्रभाव - बहुध्रुविय व्यवस्थेचा उदय 

 उत्तर - १) अलिप्ततावाद - लष्करी कराराचा भाग न होणे.

           २) राष्ट्र - एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय.

३) द्वीध्रुवीयता संपुष्टात आली- अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित झाले. 


(१) अ) NATO - युरोप

      ब) ANZUS - आफ्रिका

       क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया

       ड) CENTO - पश्चिम आशिया

उत्तर - ब) ANZUS - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अमेरिका

(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India

      ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE

      क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०

      ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती

उत्तर - क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - १९६१

(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन

      ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन

      क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.

      ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन

उत्तर - क) पारदर्शकता- सुशासन 

(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७

      ब) बांडुंग परिषद - १९५५

      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०

      ड) बेलग्रेड परिषद - १९६१

उत्तर - क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९४५

(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती

     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल

     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा

     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली

  उत्तर - ब) आझादी चळवळ - जम्मू काश्मिर

(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो

      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC

      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल

      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

         उत्तर -   ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- नेस्ले 


प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)   👇                               

१) मास्त्रीक्त करार संदर्भ -

    (अ) संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल

    (ब) युरोपीय संघ 

    (क) अमेरिकेचा कुवेत मध्ये हस्तक्षेप 

    (ड) ब्रिक्स ची स्थापना

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशात संदर्भात वापरले जाते.

(अ) भारत

(ब) चीन 

(क) फ्रान्स 

(ड) अमेरिका

३) रिओ दि जानेरिओ अर्थ समिट (1992) यावर लक्ष केंद्रित करते.

(अ) पर्यावरण आणि विकास 

(ब) आण्विक प्रसारबंदी 

(क) आंतरराष्ट्रीय व्यापार

(ड) लिंगभाव निगडीत समस्या

४) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

(अ) अमेरिका 

(ब) युनायटेड किंग्डम

(क) स्वीडन 

(ड) रशिया 

 उत्तर - १) युरोपीय संघ २) चीन ३) पर्यावरण आणि विकास ४) स्वीडन

१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

   (अ) अमेरिका

   (ब) युनायटेड किंग्डम

   (क) स्वीडन 

   (ड) रशिया

२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-

(अ) पंचायती राज

(ब) राष्ट्रीय एकात्मता

(क) राष्ट्र ही संकल्पना

(ड) Melting Pot ही संकल्पना

३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.

(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन 

(ब) शीतयुद्धात सहभाग 

(क) लोकशाही समाजवाद एक धोरण

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.

(अ) बांगलादेश 

(ब) पाकिस्तान

(क) चीन 

(ड) नेपाळ

उत्तर - १) स्वीडन २) राष्ट्रीय एकात्मता ३) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन ४) बांगलादेश

१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------

(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.

(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.

(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 

(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.

२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----

(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.

(ब) महिला सक्षमीकरणासाठी.

(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.

(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.

३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण----

(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.

(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.

(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----

(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 

(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.

(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 

(ड) महागाई कमी झाली.

उत्तर - 1) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले.

           2) पंचायतीराज सक्षम करण्यासाठी.

           3) देशातील प्रदेशांची संस्कृतीक ओळख निर्माण

 करण्यासाठी.

           4) जागतिकीकरणाचा प्रसार झाला.


प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)     👇👇

१) जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन-

२) मानवाधिकाराची जोपासना करणारी यंत्रणा -

३) एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय -

४) जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास व सिंचन पद्धतींचा विस्तार -

 उत्तर - १) परराष्ट्र धोरण २) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ३) राष्ट्र ४) हरितक्रांती


१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-

२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -

३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -

४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -

उत्तर - १) लोकपाल आणि लोकायुक्त २) दहशतवाद ३) आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ४) सॉफ्ट पॉवर


१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-

२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -

३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-

४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

उत्तर - 1) दारिद्र्य / गरिबी 2) अलिप्ततावाद 3) वन बेल्ट वन रोड 4) शेंगेन व्हिसा


प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                                   👇                                    

१) सार्कचे सदस्य - चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश

२) दंगल, उठाव, हिंसाचार, सत्याग्रह 

३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, लोकपाल,राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग,

४) पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, शिक्षण

उत्तर - १) चीन २) सत्याग्रह ३) लोकपाल ४) शिक्षण

१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन

२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद 

३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी

४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड

उत्तर - १) ग्रामोफोन २) राष्ट्रवाद ३) सोनिया गांधी 

         ४) दारिद्र्य

१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.

२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 

३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन

४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

उत्तर - 1) आधार कार्ड देणे 2) मेघालय 3) बुलेट ट्रेन 4) राष्ट्रवाद

समाप्त...... ✌✌✌





                                




Friday, March 4, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 2024साठी राज्यशास्त्र विषयाची 80 गुणांची नमुना आदर्श उत्तरपत्रिका 03

 Welcome to Dr Ram Dhage's Blogspot.

  बारावी बोर्ड परीक्षा 2024साठी राज्यशास्त्र विषयाची 80 गुणांची आदर्श नमुना उत्तरपत्रिका 03


 रयत शिक्षण संस्थेचे,

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.

सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक ३

विषय - राज्यशास्त्र

इयत्ता - बारावी वेळ - 3.०० तास गुण – ८०


-------------------------------------------------------------------

प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)                                        

१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली

(१९९०, १९८५, १९९५, १९९९)

२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.

( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)

३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.

(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)

४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.

(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)

५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.

(२००२,२००७,२००५,२०००) 

उत्तर - 1)१९८५ 2) जैतापूर 3) महिलांसाठी 4) तेलंगणा              5) २००५

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)                                

(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७

      ब) बांडुंग परिषद - १९५५

      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०

      ड) बेलग्रेड परिषद - १९६१

(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती

     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल

     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा

     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली

(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो

      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC

      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल

      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

उत्तर - 1) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९४५

           2) आझादी चळवळ - जम्मू काश्मिर

            3) ट्रान्स नॅशनल कंपनी- नेस्ले

प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)                                        

१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------

(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.

(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.

(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 

(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.

२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----

(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.

(ब) महिला सक्षमीकरणासाठी.

(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.

(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.

३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण-----

(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.

(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.

(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----

(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 

(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.

(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 

(ड) महागाई कमी झाली.

उत्तर - 1) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले.

           2) पंचायतीराज सक्षम करण्यासाठी.

           3) देशातील प्रदेशांची संस्कृतीक ओळख निर्माण करण्यासाठी.

           4) जागतिकीकरणाचा प्रसार झाला.

प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)                                 

१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-

२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -

३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-

४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

उत्तर - 1) दारिद्र्य / गरिबी  2) अलिप्ततावाद 3) वन बेल्ट वन रोड 4) शेंगेन व्हिसा

प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                            

१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.

२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 

३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन

४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

उत्तर - 1) आधार कार्ड देणे 2) दलाई लामा 3) बुलेट ट्रेन 4) राष्ट्रवाद

प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)                                    


उत्तर - 1) बांगलादेश 2) नेपाळ 3) थायलंड 4) भूतान

प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)                                       

१) हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                             

२) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)

३) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत नसणाऱ्या कोणत्याही एका देशाचे नावे लिहा. (१)     

                  


  उत्तर - 1) मालदीव, इंडोनेशिया    

            2) श्रीलंका, म्यानमार

            3) पाकिस्तान

प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                                           

१) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, मास्त्रीक्त करार युरोपियन युनियनच्या स्थापनेसाठी करण्यात आला होता.

२) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात सहभागी सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे आहे.

३) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे.

४) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, विविध समाज घटकांशी भिन्नतेमुळे अडचणी निर्माण होतात.

५) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, पारंपरिक प्रशासनात दप्तर दिरंगाई व लालफितीचा कारभार हे दोष होते.

६) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाला भारताने विरोध केला होता.

७) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते, विविधतेतून एकात्मता साध्य करते.

 ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)                                           

१) हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर.

उत्तर - 

1) जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो.

2) हार्ड पॉवर मध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात.

3) सॉफ्ट पॉवर मध्ये देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात.

4) अमेरिका, रशिया या महासत्ता हार्ड पॉवर सॉफ्ट पॉवर ही उदाहरणे आहेत.

२) भारतीय संस्कृती आणि प्रसार माध्यमे.

उत्तर - 

1) जागतिकीकरणाच्या कालखंडात प्रसार माध्यमांचा विस्तार झाला.

2) पश्चिमात्य उदार व आधुनिक विचारांना बरोबरच भोगवादी मूल्यांचा प्रसार झाला.

3) भारतीयांनी चुकीची पाश्चिमात्य मूल्य स्वीकारून पारंपरिक मूल्यांना तिलांजली दिली.

4) प्रसारमाध्यमांनी भारतीय पारंपरिक मुले व संस्था कमकुवत व शिथिल करण्याचे कामगिरी बजावली.

३) लिंगभाव असमानता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय.

उत्तर - 

1) लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे त्याचा परिणाम म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधी नाकारल्या जाणे किंवा स्त्री-पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता असणे.

2) जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात.

3) आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते.

4) स्त्रियांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते. अशाप्रकारे लिंगभाव असमानता ही स्त्रियांवर होणारे अन्यायाचे मूळ स्रोत आहे.

४) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.

उत्तर - 

1) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत.

2) भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल.

3) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला.

4) प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली.

5) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

५) अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान - बहुध्रुवियव्यवस्थेचा उदय.

उत्तर - 

1) सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जागतिक व्यवस्थेवर अमेरिकेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले होते.

2) अलीकडच्या काळात अमेरिकेच्या वर्चस्वाला युरोपियन युनियन, चीन, जपान भारत आणि रशिया यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आव्‍हान दिले आहे.

3) प्रादेशिक संघटनांचे महत्त्व वाढलेले आहे.

4) प्रादेशिक संघटना आणि नव अर्थव्यवस्थाचा उदय यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे रूपांतर बहुध्रुवीय व्यवस्थित झाले आहे.

प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)                                   

१) आधुनिक दहशतवाद.

उत्तर - 

1) पारंपरिक दहशतवादाच्या तुलनेत आधुनिक दहशतवाद अधिक कडवा, सुसंघटित आणि भयावह आहे.

2) पारंपरिक दहशतवाद विशिष्ट देशा पुरता सीमित होता. आधुनिक दहशतवादाने ती सीमारेषा ओलांडून आंतरराष्ट्रीय जागतिक व्याप्ती प्राप्त केली आहे.

3) आधुनिक दहशतवाद अमूर्त स्वरूपाची धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चा संघर्ष आहे.

4) सम्यूअल हंटिगटन या विचारवंताने यास दोन संस्कृतीमधील संघर्ष म्हणजेच पाश्चात्त्य संस्कृती आणि कडवे इस्लामी यांच्यातील संघर्ष असे म्हटले आहे इस्लामी कडव्या दहशतवादी संघटना जगात सर्वत्र सक्रिय आहेत.

5) आधुनिक दहशतवादी संघटना त्यांच्या सदस्यांना धार्मिक प्रचार प्रसाराच्या नावाखाली दहशतवादी कृत्य घडवतात.

२) जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात.

उत्तर -

1) जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात, या विधानाशी मी सहमत आहे.

2) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे संपूर्ण जगच एक बाजारपेठ किंवा व्यापारपेठ बनले आहे.

3) जागतिकीकरणानंतर संपूर्ण जगात वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीवरील निर्बंध दूर झाले आहेत.

4) जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय उद्योग व व्यापार संस्थांचा विविध क्षेत्रात प्रवेश झाला आहे.

5) जागतिकीकरणातील निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांपर्यंत दर्जेदार वस्तू व सेवा सध्या उपलब्ध होत आहे.

३) पर्यावरण ऱ्हासातून अनेक समस्या उद्भवतील.

उत्तर - पर्यावरण ऱ्हासामुळे जगासमोर पुढील समस्या उद्भवतील.

1) हवामान बदल - हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे यामुळे दुष्काळ, वनवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात.

2) प्रदूषण - हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल यांच्यात निकटचा संबंध आहे हरितगृह वायू मुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच त्याशिवाय महानगरांमध्ये दातदुखी यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते.

3) जंगल तोडीतून उद्भवणाऱ्या समस्या - जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलांवर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

4) पाण्याची कमतरता-  लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोर येईल मोठी समस्या आहे.

5) जैवविविधतेचा ऱ्हास - हवामान बदल हे ही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्नसुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो.

४) राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते.

उत्तर -

  1)राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते या विधानाशी मी सहमत आहे. कारण,

2) सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून राज्य त्यांचे राष्ट्रीय ओळख निर्माण करते.

3) लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक गटांचे एकत्रीकरण करून राज्य राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करते.

4) राज्य आणि जनता यामध सुसंवाद घडवून आणण्यासाठी लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा-आकांक्षा जाणून घेते.

5) सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करते. नागरिक यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जगतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंघ राहते.

५) भारत ही एक उगवती सत्ता आहे.

उत्तर - 

1) भारत हा एक उगवती सत्ता आहे या विधानाशी मी सहमत आहे.

2) विसाव्या शतकात चीन आणि भारताचा समावेश उगवत्या सत्तांत करण्यात येऊ लागला आहे.

3) लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा मोठा देश आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थापैकी एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे.

4) आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे यामुळेच जगातल्या सर्वात मोठ्या वीस अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजेच जी-20 फोरम मध्ये भारताला स्थान मिळाले आहे.

5) सर्वाधिक दराने वृद्धीगंत होणाऱ्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्यात येतो, म्हणजेच भारत हि एक उगवती सत्ता आहे.

प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)                                            

१) युरोपियन संघाचे विवरण करा.

उत्तर -

1) दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली.

2) 7 फेब्रुवारी 1992 रोजी मासत्रिक्त करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली.

3) या करारामुळे सहकार्याचा परीक वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार न्यायालयीन बाबी परराष्ट्र आणि संरक्षण धोरणचा समावेश झाला.

4) या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाच्या उदय झाला. युरो हे युरोपीय संघातील 28 पैकी 19 यांचे अधिकृत चलन आहे. या देशांना एकत्रितपणे युरोझोन म्हणून ओळखले जाते.

5) निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्रसंबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

6) शेंगेण प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते शेंगेन कराराद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमा नष्ट करण्यात आल्या. शेंगेंन व्हिसा पात्र व्यक्तींना सव्वीस सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते.

२) ट्रान्स नॅशनल कंपनी म्हणजे? काय ट्रान्स नॅशनल कंपनी यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले आहेत?

उत्तर - ट्रान्स नॅशनल कंपनी - व्याख्या - 

ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या ते आता परदेशी व्यापार करू लागल्या. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झाले त्यांना ट्रान्स नॅशनल कंपनी असे म्हणतात.

ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा सर्वसामान्य माणसावर परिणाम -

1) कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्‍चिम आशिया अमेरिका युरोप इत्यादी ठिकाणी काम करीत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढली आहे.

2) लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपनी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकुन आहेत.

3) शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थी शिवाय ते थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत.

३) भारत-अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घ्या.

उत्तर - 

1) अमेरिका ही शीतयुद्धकाळातील दोन महासत्तापैकी एक महासत्ता होती. आज शीतयुद्धात तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे.

2) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ.डी.रुझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, भारत स्वतंत्र झाल्यानंतर शीतयुद्धाच्या काळात संबंध बहुतांशी तणावाचे राहिले. काश्मीर प्रकरणात अमेरिकेने भारताच्या भूमिकेला सतत विरोध केला.

3) शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर ही भारत-अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरता अमेरिकेने रशियावर दबाव आणला. 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अनुचाचणी नंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते.

4) विसाव्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले. भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला. पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांनी 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे पाकिस्तानला बजावले. 2008 मधील भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळाले आहे.

5) भारत आणि अमेरिका या दोन देशातील व्यापार आणि संरक्षण विषयक संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले आहेत.

४) दारिद्र्य विषयक पारंपरिक दृष्टिकोन विशद करा.

उत्तर - 

1) संयुक्त राष्ट्रांच्या दारिद्र्याच्या व्याख्येत दारिद्र्य विषयक पर्यायी दृष्टिकोन स्पष्ट होतो. संयुक्त राष्ट्रांनी असे प्रतिपादन केले होते की, दारिद्र्य म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो.

2) संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या मते, दारिद्र्य म्हणजे रोजगाराच्या योग्य संधी व पर्यायांचा अभाव, मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन, समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवणे इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळण्या इतकी पत नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो.

3) विकासाचा पर्यायी पारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीचा भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टीकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहवासाला महत्त्व देतो. जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते.

प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०) 

१) भारतातील महिलांची स्थिती.

उत्तर -

 अ) आर्थिक असमानता - 

भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री-पुरुषांमधील वेतनातील दरी होय त्याचबरोबर सर मेकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी 28.2 टक्के इतकी कमी आहे तर तुलनेने पुरुष 78.8 टक्के आहेत.

ब) तस्करी व शोषण - 

2013 साले संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. यापुढे असे नमूद केले आहे की, त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात. त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते.              

 क) साक्षरतेचे प्रमाण- 

भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे 2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरूषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.5 टक्के आहे तर महिलांमधील प्रमाण 65.46 टक्के आहे.

 ड) राजकीय प्रतिनिधित्व  - 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेले आहे.

समारोप - भारतात आजही पुरुष प्रधान सामाजिक स्थिती असल्याने महिलांबाबत आजही अनेक समस्या आहेत.

२) स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या.

उत्तर - स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या काही प्रमुख समस्यांचे ववरण पुढील प्रमाणे आहे.

अ) आर्थिक समस्या- 

1947 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतासमोर आर्थिक मागासलेपणा, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता इत्यादी समस्या होत्या. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या समस्यांची तीव्रता सध्या कमी झाली आहे.

 ब) देशी संस्थानांचे विलीनीकरण - 

भारत स्वातंत्र्य कायदा, 1947 अन्वये भारताचे भारत व पाकिस्तानात फाळणी झाली. तसेच देशातील देशी संस्थानांना स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या राज्यकर्त्यांना भारत किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानांच्या विलीनीकरणानंतर अडचणी उद्भवल्या. मात्र 1948 अखेर सर्व देशी संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

 क) भारत-पाकिस्तान संघर्ष - 

जम्मू-काश्मीर या संस्थांच्या विलीनीकरणाच्या प्रश्‍नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 साली युद्ध उद्भवले. तेव्हापासून हा प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहे. याच प्रश्नावरून 1965, 1971 आणि 1998 साले युद्धे झाली. या व्यतिरिक्त अघोषित युद्ध म्हणजेच सीमेपलीकडील दहशतवादाने जम्मू-काश्मीर क्षेत्रात अशांतता निर्माण केली आहे.

 ड) पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामीलीकरण - 

1947 आली भारतीय उपखंडात फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्या काही वसाहती होत्या. 1960 च्या दशकात या वसाहतींच्या भारतात सामीलीकरनाची प्रक्रिया पूर्ण झाली. 

ई) फुटीरतावादी चळवळी - 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारताला नागा बंडखोरांचा फुटीरतावादी चळवळी शील संघर्ष करावा लागला कालांतराने मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा फुटीरतावादी चळवळी फोफावल्या 1970च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ उद्भवली या सर्व चळवळीतून उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण भारत सरकारने केली आहे.

समारोप - स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, भाषिक  विविधतेमुळे भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

समाप्त

Monday, February 28, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 202४ साठी राज्यशास्त्र विषयाची सराव नमुना उत्तरपत्रिका 02

                       

बारावी बोर्ड परीक्षा 2024 साठी राज्यशास्त्र विषयाची सराव नमुना उत्तरपत्रिका 02


                          रयत शिक्षण संस्थेचे,

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.

सराव उत्तर पत्रिका क्रमांक २: २०२४

विषय - राज्यशास्त्र

इयत्ता - बारावी वेळ - ३.०० तास गुण – ८०

-------------------------------------------------------------------

प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.(५)                                                                        

१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.

( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.

( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)

३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.

(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)

४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.

(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) दविध्रुवितेचा अस्त  २) चीन ३) सक्षमीकरण 

         ४) नक्षलवादी चळवळ ५) पंडित नेहरू

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)                          

(१) अ) NATO - युरोप

      ब) ANZUS - आफ्रिका

       क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया

       ड) CENTO - पश्चिम आशिया

उत्तर - ANZUS - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अमेरिका

(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India

      ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE

      क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०

      ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती

उत्तर -  क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - १९६१

(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन

      ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन

      क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.

      ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन

उत्तर - क) पारदर्शकता- सुशासन

प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)                             

१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

   (अ) अमेरिका

   (ब) युनायटेड किंग्डम

   (क) स्वीडन 

   (ड) रशिया

२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-

(अ) पंचायती राज

(ब) राष्ट्रीय एकात्मता

(क) राष्ट्र ही संकल्पना

(ड) Melting Pot ही संकल्पना

३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.

(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन 

(ब) शीतयुद्धात सहभाग 

(क) लोकशाही समाजवाद एक धोरण

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.

(अ) बांगलादेश 

(ब) पाकिस्तान

(क) चीन 

(ड) नेपाळ

उत्तर - १) स्वीडन  २) राष्ट्रीय एकात्मता ३) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन ४) बांगलादेश

प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)                                      

१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-

२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -

३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -

४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -

उत्तर - १) लोकपाल आणि लोकायुक्त  २) दहशतवाद ३) आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ४) सॉफ्ट पॉवर

प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)          

१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन

२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद 

३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी

४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड

उत्तर - १) ग्रामोफोन  २) राष्ट्रवाद ३) सोनिया गांधी 

         ४) दारिद्र्य

प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)           

     उत्तर - १) भौगोलिक  २) ऐतिहासिक ३) राजकीय 

              ४) आर्थिक                                   

प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)          

१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                         

२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)                

३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)


उत्तर - १) स्पेन,फ्रान्स  

         २) नॉर्वे, रुमानिया

          ३) बेलारूस, युक्रेन

प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                                      

१) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, 1990 च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.

२) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे.

३) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक संरक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.

४) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, स्वातंत्र्य चळवळीमुळे सर्व भारतीय विविधता विसरून एकत्र आल्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळ पोषक ठरली.

५) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, लोकायुक्तांना फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी विरोधात चौकशी करण्याचे अधिकार आहेत.

६) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, प्राचीन काळापासून भारताचे म्यानमार सोबत आर्थिक, सांस्कृतिक संबंध आहेत.

७) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण,  सागरमाला ही योजना बंदराधिरीत विकासासाठी आहे.

प्रश्न ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)                                             

१) जागतिकीकरण आणि संस्कृती.

उत्तर - 

1) जागतिकीकरण संस्कृतीचा वाहक आहे.

2) समाजात व्यक्तिवाद व भौतिक वाद वाढला आहे.

3) पारंपरिक मूल्यांचा पेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण  ही मूल्य अधिक महत्त्वाची वाटू लागले आहेत.

4) खानपानमध्ये बर्गर व पिज्जासारख्या परकीय खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

२) गरीबी आणि विकास.

उत्तर - 

1)भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याची जोड दिलेली आहे.

2) भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगीकरण होय. मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला.

3) भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने, उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला.

4) समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती, भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्याचबरोबर नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे.

३) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता.

उत्तर - 

1) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत.

2) भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल.

3) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला.

4) प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली.

5) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

४) सुशासन आणि ई- प्रशासन.

उत्तर -

1) सुशासन आणि ई-प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत.

2) माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते.

3) नागरिकांच्या तक्रारींची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठी चे निर्णय त्वरेने आणि न्याय पूर्वक घ्यावे लागतात.

4) प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रति उत्तरदायित्व प्रस्तावित होते.

५) पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण.

उत्तर - 

1) 7 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

2) ज्यांच्या मुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्परविरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे.

3) इंग्लंड बरोबरच अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत.

4) चीन बरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

5) आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणतात, आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशिया साठी महत्त्वाचे आहे.

प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)                                        

१) आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.

उत्तर - 1990 च्या दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेच्या आधिपत्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आव्हान देण्याचा संघटित प्रयत्न अन्य देशांनी केला आहे. एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे आहे. या जाणिवेतून युरोपियन युनियनची स्थापना झाली. त्याचप्रमाणे रशिया, चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावादाद्वारा सत्ता संतुलन जोपासले जाईल आणि अमेरिकेसारखी महासत्ता आपली मनमानी करू शकणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकता महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

२) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज.

उत्तर - पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवती असणारे वातावरण आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव वनस्पती मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. मानव निर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचा भाग समजला जातो. परंतु सध्या पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे या समस्या कमी करून आजच्या पिढीच्या गरजा कमी करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. मानव निर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे.उदा. हवामानातील बदल, वाढते प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण ही आता काळाची गरज बनली आहे.

३) शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.

उत्तर - 

सार्वजनिक सुव्यवस्था स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. यात शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते. यांच्या अभावी देशात फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजात विविध गट असतातच, सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. राष्ट्रांमध्ये लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे लोक असतात. त्यांच्यात शांतता आणि स्थैर्य असेल तर राष्ट्राची प्रगती होते. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राष्ट्राचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे, या कार्याला राष्ट्र उभारण्याचे कार्य असे संबोधले जाते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था यांची नितांत गरज असते.

४) हिंदी महासागरात भारताची भूमिका.

उत्तर - 

1) हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे.

2) पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

3) प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

4) आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्र निर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे.

५) ई - प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.

उत्तर - 

1) माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ही प्रशासनाकडे वळत आहेत गेल्या काही दशकात प्रशासन गुंतागुंतीचे व वैविध्यपूर्ण होत आहे.

2) नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा ही अनेक पटीने वाढले आहेत. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे हवी असेल तेव्हा ती परत मिळवणे, जलदगतीने पाठवणे शक्य झाले आहे.

3) माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवान पणे प्रक्रिया करणे सुलभ झाले आहे. यातून शासनाच्या कार्यपद्धतीला वेग घेण्यास, निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास, पारदर्शकता वाढविण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे.

4) ई-प्रशासन यामुळे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढविण्यास सहाय्य झाले आहे.

प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)                                      

१) सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर - सॉफ्ट पॉवर - अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सोफ्ट पॉवर होय. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा संस्कृती प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात.

अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे खालील प्रमाणे-

अ) शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम - अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे.

ब) आंतरजाल -आंतरजाला द्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार हेसुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे.

क) फूड चेनस - अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादीची उदाहरणे आहेत.

२) जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणते आहेत.

उत्तर - 

अ) सकारात्मक बाजू - 

1) तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी- व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.

2) खाजगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे.

3) आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते.

ब) नकारात्मक बाजू -

1) राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे.

2) स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील हे देखील भीती आहे.

3) शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.

३) महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून भारतातील महिला सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा.

उत्तर -

 महिला सक्षमीकरण - महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्या त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे होय.

भारतातील महिला सक्षमीकरणासाठीचे उपाय - 

1) भारतातील कायदे व धोरण - भारतातील लोकशाही कायदे आणि विकासात्मक धोरणांच्या परिघात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्यात आले. 1953 साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची (CSWB) स्थापना केली गेली. याचा उद्देश कुटुंब महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे हा होता.

2) भारत सरकारचा कल्याणकारी दृष्टीकोण - भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे. याचा मूळ उद्देश हा महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामांपासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्री आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे हा होता.  1970च्या दशकापासून कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावर भर देण्यात आला. आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर, मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य शिक्षण व पोषण, कुटुंब नियोजन हा होता.

3) महिला सक्षमीकरण - 1990 च्या दशकात विकासाची जागा सक्षमीकरनाने घेतली. शासनाला विकासाचे फायदे महिलांनाही करून द्यायचे होते. त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी मध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागला. 1990मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. भारताच्या संविधानातील 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीमुळे 1993 मध्ये पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले.

4) 2016 चे महिला राष्ट्रीय धोरण - 2016 मध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती केली. यामुळे महिलांविरोधी सर्व प्रकारच्या विषयाची दखल घेतली. सामाजिक,आर्थिक, राजकीय, शासकीय संस्था व धोरण निर्मितीमध्ये महिलांना समान सहभाग करून घेणे, भेदभावाच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवणे, सायबर स्पेस महिलांसाठी सुरक्षित बनवणे अशा धोरणांचा अमल करण्यात आला.

४) जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.

उत्तर - भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. आणि तिथूनच जम्मू-काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली. हरीसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली. आणि जम्मू काश्मीर भारतात सामील झाले. मग भारताने काश्मीरच्या संरक्षणाकरता आपले सैन्य पाठवले, यातूनच 1947- 48 मध्ये पहिले भारत-पाक युद्ध झाले. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना भारताविरुद्ध भडवण्याच्या उद्देशाने 1965 मध्ये भारतात पाकिस्तानने घुसखोर पाठवले. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष आक्रमण केले तेव्हा स्थानिकांनी त्यांना सहकार्य केले नाही. 1965 मध्ये पाक लष्करशहा खान यांनी पाकव्याप्त काश्मीर मध्ये Plebiscite front  ची स्थापना केली. या आघाडीचे अनेक अनधिकृत लष्करी गट नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या. 1977 मध्ये यालाच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. 1989मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तसेच पुढे काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आल्या. आणि दिवसेंदिवस जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद आधुनिक स्वरूप घेत असताना आपल्याला दिसत आहे.

  ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०)

१) भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.

उत्तर - 

 अ) भौगोलिक घटक - दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्य कडील हिमालय पर्वतांच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे. संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीन सारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे, परंतु त्यापैकी कोणत्याही देशांची एकमेकांबरोबर सीमा नाही.दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे.

ब) ऐतिहासिक घटक - शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्‍चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो. वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दरम्यान आखली गेली होती.

क) आर्थिक घटक - अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक संदर्भही आहे. वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आर्थिक मदती बरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला आहे. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण याची धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले.

 ड) राजकीय घटक - भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाची कार्यकारी मंडळ महत्त्वाचे भूमिका बजावते, तर संसद जागल्याची भूमिका बजावते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्री यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.

ई) आंतरराष्ट्रीय व्यवस्था - शीतयुद्धाच्या काळात दवीध्रुविय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. शीतयुद्ध उत्तर काळातील भारत-अमेरिका दरम्यानचा संवाद, 1960 च्या दशकानंतर चीन-पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो.

२) जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर - 

 अ) सहभागात्मक - हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे. जनतेचा आवाज आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या जातात. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी मध्ये सहभागी होण्याची संधी लोकांना यामुळे मिळते.

ब) पारदर्शकता - पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे.  

 क) प्रतिसादात्मक - सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न याबाबतीत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करते.

 ड) उत्तरदायित्व - सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांची प्रति उत्तरदायी असायला हव्यात. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्यघटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते, ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कारवाईचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असणे गरजेचे असते.

इ) कायद्याचे राज्य - संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे संविधानातील म्हणजे प्रशासनाला मार्गदर्शनाचे कार्य करतात कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्कांचे हमी दिली जाते. 

 समाप्त...












पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महा...