Friday, March 20, 2020

SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न - योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे


SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरा सह -
योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे



प्रश्न-  खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

(१) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
उत्तर- योग्य

(२) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-
भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा
जास्त आहे.

(४) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
उत्तर- योग्य

(५) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा
लाभला आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझील देशाला अटलांटीक महासागराचा किनारा लाभला आहे.

(६) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

(७) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.
उत्तर- योग्य

(८) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा
परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर- योग्य

(९) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान
ऋतू असतात.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असुु शकत नाहीत.

(१०) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
उत्तर- योग्य

(११) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या
प्रमाणात पाऊस पडतो.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-.ब्राझील देशात आग्नेय ईशान्यदिशेकडून येणाऱ्या  पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.



प्रश्न- पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.


(१) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
उत्तर : 
(१) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत
वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीदवारे अडवले जातात.
(२) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत
जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व बाझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
(३) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य
पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो..

(२) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर : 
 (१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय
वाऱ्यांमळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखादया देशातीलसमुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण
कटिबंधात आहे.
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही..

(३) ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे
उत्तर : 
(१) कृमी व कोटक है प्रामुख्यान घनदाट वनांन प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
(२) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी वर
खादय असते.
(३) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे.
नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पटना
दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीट
संख्या जास्त आहे.

(४) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
उत्तर : 
 (१) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(३) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्यावाढत आहेत. भारतात 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

(५) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.
उत्तर : 

(१) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे
प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका' या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
(३) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

(६) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर : 
 (१) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेकवसाहतवादयांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
(२) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
(३) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

(७) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
उत्तर : 
 (१) शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा
प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
(२) या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.'
(३) या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.'

(८) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर : 
(१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या
पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(९) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय
भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
(२) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
(३) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय
कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.


(१०) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर : 
 (१) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस
किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७,२६३ चौरस किमी आहे.
(२) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट,भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
(३) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व
लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

(११) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर : 
 (१) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे
सह-अस्तित्व असते.
(२) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
(३) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य,
शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.


(१२) ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.
उत्तर : 
(१) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२)ब्राझीलमधील बहतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
(३) ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणन
(अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.

(१३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या
प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उदयोग भरभरातीस आले आहेत.
(३) या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.

(१४) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.
उत्तर : 
(१) वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहना
दसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते.
(२) वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते.
(३) वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व
आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.

(१५) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
उत्तर : 
 (१) जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे.
त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
(२) आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात
निर्यात केली जाते.
(३) आतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.


1 comment:

  1. Hi my name is raj your website is really good and useful for me plzzzzzz make all subjects website for 10 srd

    ReplyDelete

HSC Board feb 2025 Result

   HSC Board feb 2025 Result HSC Board Exam February 2025 Result Date  05/05/2025   इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक...