रयत शिक्षण संस्थेचे,
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.
सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक २: २०२५
विषय - राज्यशास्त्र
इयत्ता - बारावी वेळ - ३ तास गुण – ८०
---------------------------------------------------------------------
प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.(५)
१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.
( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)
२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.
( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)
३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.
(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)
४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.
(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)
५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.
(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)
प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)
(१) अ) NATO - युरोप
ब) ANZUS - आफ्रिका
क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया
ड) CENTO - पश्चिम आशिया
(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India
ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE
क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०
ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती
(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन
ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन
क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.
ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन
प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)
१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.
(अ) अमेरिका
(ब) युनायटेड किंग्डम
(क) स्वीडन
(ड) रशिया
२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-
(अ) पंचायती राज
(ब) राष्ट्रीय एकात्मता
(क) राष्ट्र ही संकल्पना
(ड) Melting Pot ही संकल्पना
३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.
(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन
(ब) शीतयुद्धात सहभाग
(क) लोकशाही समाजवाद एक धोरण
(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण
४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.
(अ) बांगलादेश
(ब) पाकिस्तान
(क) चीन
(ड) नेपाळ
प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)
१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -
३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -
४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -
प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)
१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन
२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद
३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी
४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड
प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)
प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)
१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)
२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)
३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)
प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)
१) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.
२) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.
३) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.
४) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
५) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
६) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.
७) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.
प्रश्न ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)
१) जागतिकीकरण आणि संस्कृती.
२) गरीबी आणि विकास.
३) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता.
४) सुशासन आणि ई- प्रशासन.
५) पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण.
प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)
१) आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.
२) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज.
३) शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.
४) हिंदी महासागरात भारताची भूमिका.
५) ई - प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)
१) सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा.
२) जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणते आहेत.
३) सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा.
४) जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.
प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०)
१) भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.
अ) भौगोलिक घटक ब) ऐतिहासिक घटक क) आर्थिक घटक ड) राजकीय घटक ई) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
२) जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
अ) लोकशाहीचे महत्त्व ब) राज्याचे स्थान
क) बिगर राजकीय घटक ड) मानवी हक्क
Dinesh Barkau Nikam
ReplyDeletePoonam kadlag
ReplyDelete