Sunday, January 30, 2022

बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका 3

  
रयत शिक्षण संस्थेचे,
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.
सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक ३
विषय - राज्यशास्त्र
इयत्ता - बारावी       वेळ - 3.00 तास      गुण – ८०
-----------------------------------------------------------------------------
प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)                                        
१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली
(१९९०, १९८५, १९९५, १९९९)
२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.
( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)
३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.
(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)
४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.
(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)
५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.
(२००२,२००७,२००५,२०००) 
प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)                                
(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७
      ब) बांडुंग परिषद - १९५५
      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०
      ड) बेलग्रेड परिषद - १९६१
(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती
     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल
     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा
     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली
(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो
      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC
      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल
      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)                                        
१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------
(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.
(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.
(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 
(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.
२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----
(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.
(ब) महिला सक्षमीकरणासाठी.
(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.
(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.
३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण-----
(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.
(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.
(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.
(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण
४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----
(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 
(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.
(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 
(ड) महागाई कमी झाली.

प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)                                 
१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-
२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -
३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-
४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                            
१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.
२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 
३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन
४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)                                    


प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)                                       
१) हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                             
२) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                  
३) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत नसणाऱ्या कोणत्याही एका देशाचे नावे लिहा. (१)                                                  

प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                                           
१) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.
२) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.
३) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.
४) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.
५) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.
६) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.
७) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

 ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)                                           
१) हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर.
२) भारतीय संस्कृती आणि प्रसार माध्यमे.
३) लिंगभाव समानता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय.
४) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.
५) अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान - बहुध्रुवियव्यवस्थेचा उदय.

प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)                                   
१) आधुनिक दहशतवाद.
२) जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात.
३) पर्यावरण रहसातून अनेक समस्या उद्भवतील.
४) राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते.
५) भारत ही एक उगवती सत्ता आहे.

प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)                                            
१) युरोपियन संघाचे विवरण करा.
२) ट्रान्स नॅशनल कंपनी म्हणजे? काय ट्रान्स नॅशनल कंपनी यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले आहेत?
३) भारत-अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घ्या.
४) दारिद्र्य विषयक पारंपरिक दृष्टिकोन विशद करा.

प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०)
१) भारतातील महिलांची स्थिती.
 अ) आर्थिक असमानता ब) तस्करी व शोषण                 
 क) साक्षरतेचे प्रमाण ड) राजकीय प्रतिनिधित्व  

२) स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या.
अ) आर्थिक समस्या ब) देशी संस्थानांचे विलीनीकरण क) भारत-पाकिस्तान संघर्ष    
 ड) पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामीलीकरण ई) फुटीरतावादी चळवळी

समाप्त

2 comments:

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा प्रा. डॉ. राम ढगे. भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनी शासक...