Sunday, March 6, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 2025 साठी महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न 3 राज्यशास्त्र विषय

 

बारावी बोर्ड परीक्षा 2025साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न तिसरा चूक की बरोबर 10 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न तिसरा 10 गुणांसाठी सराव


प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                          

१) सूशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सुशासन आत समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा समावेश होतो.

२) समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.

३) नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, नियोजन आयोगाची निर्मिती सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी केलेली आहे.

४) जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ बनली आहे.

५) दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार व्यवस्था करार २००६ पासून कार्यान्वित आहे.

६) शहरातील मॉल्सच्या स्पर्धेत छोट्या दुकानदारांचा टिकाव लागत नाही.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, शहरातील मॉल्स त्यांच्या ग्राहकांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देत असतात.

७) भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण - भारतातील असंख्य जाती, धर्म, भाषा, वंश व प्रांतीय अस्मिता यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या गुंतागुंतीची झालेली आहे.

८) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, 1990 च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.

९) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे.

१०) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक संरक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.

११) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, स्वातंत्र्य चळवळीमुळे सर्व भारतीय विविधता विसरून एकत्र आल्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळ पोषक ठरली.

१२) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, लोकायुक्तांना फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी विरोधात चौकशी करण्याचे अधिकार आहेत.

१३) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, प्राचीन काळापासून भारताचे म्यानमार सोबत आर्थिक, सांस्कृतिक संबंध आहेत.

१४) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, सागरमाला ही योजना बंदराधिरीत विकासासाठी आहे.

१५) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, मास्त्रीक्त करार युरोपियन युनियनच्या स्थापनेसाठी करण्यात आला होता.

१६) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात सहभागी सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे आहे.

१७) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे.

१८) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, विविध समाज घटकांशी भिन्नतेमुळे अडचणी निर्माण होतात.

१९) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, पारंपरिक प्रशासनात दप्तर दिरंगाई व लालफितीचा कारभार हे दोष होते.

२०) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाला भारताने विरोध केला होता.

२१) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते, विविधतेतून एकात्मता साध्य करते.

21 comments:

HSC Board feb 2025 Result

   HSC Board feb 2025 Result HSC Board Exam February 2025 Result Date  05/05/2025   इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक...