Thursday, February 27, 2020

S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (चूक की बरोबर)




S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह 
             

                     (चूक की बरोबर)








S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (चूक की बरोबर)



(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.

उत्तर- हे विधान बरोबर आहे,

कारण---

मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही.



२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

 उत्तर -हे विधान चूक आहे,

 कारण---

 या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास मदत झाली व शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.



३) जनतेचा सहभाग लक्षात घेता भारतीय लोकशाही मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाल्याचे दिसते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

कारण---

 लोकशाहीतील निवडणुकांमुळे मतदारांमध्ये राजकीय जाणीव निर्माण झाली, त्यामुळे मतदान करणार्‍यांच्या संख्येतही ही वाढ झाली. जनतेच्या या राजकीय सहभागाचा विचार करता भारतीय लोकशाही ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते.



४) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाचा प्रमाणे दिसते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

 कारण---

 आवश्यकतेनुसार संविधानात संसदेला बदल करता येतो, संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाचा प्रमाणे असते.



५) सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे हे लोकशाहीचे ध्येय असते.



६) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

 उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेता येतात.



७) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्याने किंवा निधन झाल्याने तसेच पक्षांतर केल्याने सदस्यत्व रद्द होते अशा वेळी निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोट निवडणूक घेतो.



८) एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरविते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

 निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते, त्यामुळे हा निर्णय निवडणूक आयोग घेतो.



९) निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी.

उत्तर - हे विधान चूक आहे,

कारण---

 निवडणूका न्यायमार्गाने, खुल्या वातावरणात, भ्रष्टाचार मुक्त झाल्या नाहीत तर प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे अशक्य होईल म्हणून निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असू नये.



१०) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हानी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.



११) राजकीय पक्ष या सामाजिक संघटना असतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

 कारण---

 समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात, राजकीय पक्ष समाजाची भूमिका विचारसरणी समोर ठेवून कार्य करत असतात.



१२)आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

 आघाडी सरकारच्या काळात पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार स्थिरपणे चालू शकतात.



१३) शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही, तो पंजाब राज्यापुरता मर्यादीत व प्रभावी असल्याने त्याला निवडणूक आयोगाने प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे.



१४) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो, म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.



१५) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

 कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यश-अपयश हे नेतृत्व वरच अवलंबून असते.



१६)ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली अस्तित्वात आला, त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काचे जाणीव व्हावी त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.



१७) डॉ. राजेन्द्र सिंह राणा यांना भारताचे जल पुरुष या नावाने ओळखले जाते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

डॉ. राणा यांनी राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात नद्या पुनर्जीवित केल्या तसेच देशभर 11000 जोहड बांधले सतत 31 वर्ष केलेल्या केलेल्या जलक्रांती मुळे त्यांना भारताचे जलपुरुष म्हणतात.

7 comments:

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा प्रा. डॉ. राम ढगे. भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनी शासक...