महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध भाषांमध्ये पाठ्यपुराक व पूरक साहित्य तयार करत आहे. सध्या संपूर्ण भारतात नवीन राष्ट्रीय धोरण 2020 राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा विषय समित्यांचे गठन करणे शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे यासाठी भाषा व विषय समित्यावर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकातील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची निवड करण्यासाठी सदर लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.Thursday, July 7, 2022
पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध भाषांमध्ये पाठ्यपुराक व पूरक साहित्य तयार करत आहे. सध्या संपूर्ण भारतात नवीन राष्ट्रीय धोरण 2020 राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा विषय समित्यांचे गठन करणे शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे यासाठी भाषा व विषय समित्यावर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकातील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची निवड करण्यासाठी सदर लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.Sunday, January 30, 2022
बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका 2
रयत शिक्षण संस्थेचे,
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.
सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक २: २०२५
विषय - राज्यशास्त्र
इयत्ता - बारावी वेळ - ३ तास गुण – ८०
---------------------------------------------------------------------
प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.(५)
१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.
( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)
२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.
( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)
३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.
(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)
४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.
(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)
५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.
(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)
प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)
(१) अ) NATO - युरोप
ब) ANZUS - आफ्रिका
क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया
ड) CENTO - पश्चिम आशिया
(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India
ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE
क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०
ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती
(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन
ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन
क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.
ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन
प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)
१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.
(अ) अमेरिका
(ब) युनायटेड किंग्डम
(क) स्वीडन
(ड) रशिया
२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-
(अ) पंचायती राज
(ब) राष्ट्रीय एकात्मता
(क) राष्ट्र ही संकल्पना
(ड) Melting Pot ही संकल्पना
३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.
(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन
(ब) शीतयुद्धात सहभाग
(क) लोकशाही समाजवाद एक धोरण
(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण
४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.
(अ) बांगलादेश
(ब) पाकिस्तान
(क) चीन
(ड) नेपाळ
प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)
१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -
३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -
४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -
प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)
१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन
२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद
३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी
४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड
प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)
प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)
१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)
२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)
३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)
प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)
१) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.
२) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.
३) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.
४) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
५) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
६) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.
७) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.
प्रश्न ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)
१) जागतिकीकरण आणि संस्कृती.
२) गरीबी आणि विकास.
३) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता.
४) सुशासन आणि ई- प्रशासन.
५) पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण.
प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)
१) आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.
२) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज.
३) शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.
४) हिंदी महासागरात भारताची भूमिका.
५) ई - प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)
१) सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा.
२) जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणते आहेत.
३) सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा.
४) जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.
प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०)
१) भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.
अ) भौगोलिक घटक ब) ऐतिहासिक घटक क) आर्थिक घटक ड) राजकीय घटक ई) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
२) जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
अ) लोकशाहीचे महत्त्व ब) राज्याचे स्थान
क) बिगर राजकीय घटक ड) मानवी हक्क
बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका 3
Monday, January 24, 2022
राष्ट्रीय मतदार दिवस - डॉ. राम ढगे.
Wednesday, November 25, 2020
जागर भारतीय संविधानाचा- डॉ. राम ढगे.
Wednesday, September 9, 2020
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019
१. शालेय शिक्षण
अ. प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण: सदर धोरण प्रारंभिक वर्षांच्या महत्वावर भर देते आणि २०२५ सालापर्यंत ३ ते ६ वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील दर्जेदार निगा व शिक्षण दिले जात असल्याची दक्षता घेणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. याकरिता गुंतवणुकीमध्ये लाक्षणिक वाढ करून नवनवीन उपक्रम राबविण्याचाही या धोरणाच्या उद्दिष्टामध्ये समावेश आहे.
आ. पायाभूत साक्षरता व अंकज्ञान: इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रारंभिक भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरविले जाईल. सन २०२५ पर्यंत इयत्ता पाचवी व त्यापुढील इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता घेणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
इ. अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र: शालेय शिक्षणासाठी ५+३+३+४ रचनेवर आधारित बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्त्वांवर आधारित एक अभिनव विकासात्मकदृष्ट्या योग्य अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र रचना विकसित करण्यात आली आहे. शाळांमध्ये विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, क्रीडा, गणित इ. सर्व विषयांवर समान भर देताना व्यावसायिक (पेशाविषयक) व शैक्षणिक शाखांचे एकीकरण करण्यात येईल.
ई. वैश्विक प्रवेश: सन २०३० पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये १००% ग्रॉस एनरोलमेंट रेशो (म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर) आत्मसात करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
उ. न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षण: जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडित परिस्थितीमुळे कोणतेही मूल शिकण्याच्या व प्रगतीच्या एकाही संधीला मुकणार नाही, याची हमी देण्यासाठी या धोरणामध्ये अनेक नियोजित उपाययोजना अंतर्भूत आहेत. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष शिक्षण झोनदेखील उभारण्यात येतील.
ऊ. शिक्षक: शिक्षकांची नेमणूक अतिशय सक्षम व पारदर्शक प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. शिक्षकांना गुणवत्तेच्या निकषांनुसार बढती देण्यात येईल. कामगिरीचे बहुस्रोतांवर आधारित नियमित मूल्यमापन करण्यात येईल आणि शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षकांचे शिक्षक होण्यासाठी श्रेणी प्रगमनाचे (प्रोग्रेशन) मार्ग उपलब्ध असतील.
ऋ. शालेय अनुशासन: शाळांची व्यवस्था व आयोजन शालेय संकुलांमध्ये (शालेय संकुल म्हणजे १०-२० शासकीय शाळांचा समूह) करण्यात येईल. अनुशासन व प्रशासन यांचे हे मूलभूत एकक असेल. याद्वारे सक्षम व्यावसायिक शिक्षक समुदायासोबतच पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), शैक्षणिक सुविधा (उदा.ग्रंथालये) व मनुष्यबळ (उदा. कला व संगीत शिक्षक) अशा सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता होत असल्याची दक्षता घेता येईल.
ल. शालेय विनियमन: स्वारस्यसंघर्ष टाळण्याहेतू शाळांचे विनियमन व प्रचालन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल. धोरणनिर्मिती, विनियमन (रेग्युलेशन), प्रचालन (ऑपरेशन्स) व शैक्षणिक बाबींकरिता सुस्पष्ट व स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात असतील.
२. उच्च शिक्षण
अ. नवीन संरचना (आर्किटेक्चर): विशाल, सर्वसाधनसमृद्ध, चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज संस्थांद्वारे उच्च शिक्षणासाठी नवीन दूरदृष्टी व संरचना (आर्किटेक्चर) परिकल्पित करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेली ८०० विद्यापीठे व ४०,००० महाविद्यालये सुमारे १५,००० उत्कृष्ट संस्थांमध्ये संकलित करण्यात येईल.
आ. उदारमतवादी शिक्षण: विज्ञान, कला, मानवतावाद, गणित व व्यावसायिक क्षेत्रांचा एकात्मिक व सखोल अनुभव मिळण्याच्या उद्देशाने पदवीपूर्व (अंडरग्रॅज्युएट) स्तरावरील व्यापक स्वरूपाचे उदारमतवादी कलाशिक्षण अंमलात आणण्यात येईल. यामध्ये कल्पनाविलासी व लवचिक अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासाचे कल्पक संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकीकरण आणि बहुविध प्रवेश/प्रस्थान बिंदू (एंट्री/एक्झिटपॉईंट्स) असतील.
इ. अनुशासन: संस्थांचे अनुशासन शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक स्वायत्ततेवर आधारित असेल. प्रत्येक उच्चशिक्षण संस्था एका स्वतंत्र मंडळाकडून प्रशासित असेल.
ई. विनियमन: आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी संस्थांचे विनियमन 'सुटसुटीत पण कडक' पद्धतीचेअसेल आणि स्वारस्यसंघर्ष टाळण्याहेतू जनहितार्थ उद्देशाने करावयाची शाळांची प्रमाणित उभारणी,वित्तपुरवठा, प्रमाणन (ऍक्रेडिटेशन) व विनियमन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल.
३. शिक्षक शिक्षण
शिक्षक सजता कार्यक्रम अतिशय कसून घेण्यात येतील आणि सदर कार्यक्रम चैतन्यमय, बहुविध शाखांनी सुसज्जअसलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येतील. बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या या उच्च शिक्षणसंस्थांमध्ये स्तरानुसार, विषयवार राबविण्यात येणारा व एकीकरण केलेला ४ वर्षांचा 'बॅचलर ऑफ एज्युकेशन'हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादित करणे, हा शिक्षक होण्याचा प्रमुख मार्ग असेल, दुय्यम दर्जाच्या व अकार्यक्षम शिक्षक शिक्षण संस्था बंद करण्यात येतील,
४. पेशाविषयक शिक्षण
सर्व प्रकारचे पेशाविषयक/व्यावसायिक शिक्षण उच्च शिक्षण प्रणालीचा अविभाज्य घटक असेल, स्वतंत्र तांत्रिकविद्यापीठे, आरोग्यशास्त्र विद्यापीठे, विधी व कृषी विद्यापीठे किंवा या क्षेत्रातील किंवा तत्सम इतर क्षेत्रांतील संस्था बंद करण्यात येतील.
५. व्यावसायिक शिक्षण
व्यावसायिक शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असेल. सन २०२५ पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान ५०% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
६. नॅशनल रिसर्च फाऊंडेशन
संपूर्ण देशभर संशोधन व नवकल्पना या गोष्टींचा प्रसार वेगाने व्हावा, या हेतूने नवीन संस्थेची स्थापना करण्यात येईल.
७. शिक्षणामध्ये तंत्रज्ञान
वर्गातील शिक्षण प्रक्रिया सुधारण्यासाठी, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास साहाय्य करण्यासाठी, वंचितगटांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी आणि शैक्षणिक नियोजन, प्रशासन व व्यवस्थापन सुसूत्रबद्ध करण्यासाठी शिक्षणाच्या सर्वच स्तरांवर योग्य पद्धतीने तंत्रज्ञान समाविष्ट करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
८. प्रौढ शिक्षण
युवकांमध्ये व प्रौढांमध्ये १००% साक्षरता साध्य करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
९. भारतीय भाषांना चालना
हे धोरण सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, वृद्धी व चैतन्य अबाधित राहील, हे सुनिश्चित करेल.
१०. शिक्षणासाठी वित्तपुरवठा
सार्वजनिक शिक्षणाचा विस्तार व पुनरुज्जीवन करण्यास्तव मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रातून गुंतवणूक करण्यात येईल.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशनची स्थापना करण्यात येईल. हा आयोग भारतातील शैक्षणिक दूरदृष्टीचा परिरक्षक (कस्टोडियन) असेल.
संदर्भ - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019
क्रमशः
Sunday, April 19, 2020
बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.
बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा २०२६ साठी आदर्श नमुना उत्तरपत्रिका १
आदर्श नमुना उत्तरपत्रिका Model Anser Sheet रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. सराव परीक्षा उत्तरपत्रिका क्र...
-
आदर्श नमुना उत्तरपत्रिका Model Anser Sheet रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. सराव परीक्षा उत्तरपत्रिका क्र...
-
बारावी बोर्ड परीक्षा 2026 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न तिसरा चूक की बरोबर 10 गुणांसाठी उत्तरासहित👇 (निळ्या र...
-
बारावी बोर्ड परीक्षा 2026 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न दुसरा संकल्पना चित्र व नकाशा 09 गुणांसाठी उत्तरासहित👇 ...

